विकसित महाराष्ट्राची रूपरेषा ठरविण्यास द्या आपला सहभाग
विकसित महाराष्ट्र- २०४७ च्या व्हिजन मध्ये नागरिकांचे मत, अपेक्षा, आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीने राज्यव्यापी नागरिक सर्वेक्षण अभियानाचे उद्घाटन मा. मुख्यमंत्री यांनी दिनांक १७ जून, २०२५ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये केले आहे. सर्व आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आपल्या विभागांतर्गत संघटना, क्षेत्रीय कार्यालये, शासकीय / निमशासकीय महामंडळे, स्वायत्त संस्था कार्यालय प्रमुखांनी सर्वेक्षणामध्ये सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत.